मालदीवला भारताकडून ४२३ कोटींची मदत   

माले : पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताने मालदीव या मुस्लिम देशासाठी आपली तिजोरी उघडली. भारताने मालदीवला ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ४२३ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर ही मदत चर्चेत आहे.
 
मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी वेळेत केलेल्या मदतीबद्दल  भारत सरकारचे आभार मानले आहेत. एक्सवर शेअर केलेल्या निवेदनात मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने म्हटले आहे की, भारत ५० मिलियन अमेरिकन डॉलरच्या ट्रेझरी बिलाच्या रोलओव्हरच्या माध्यमातून मालदीवला आर्थिक मदत पुरवत आहे. मार्च २०१९ पासून भारत दरवर्षी मालदीव सरकारला व्याजमुक्त आर्थिक मदत करत आहे. हा दोन्ही देशांमधील द्वि-मार्गी व्यवस्थेचा एक भाग आहे.

दोन्ही देशांमध्ये करार 

या वर्षाच्या सुरुवातीला भारताने मालदीवसोबत मालदीवला आवश्यक वस्तूंच्या निर्यातीसाठी विशेष कोटा वाढवण्यासाठी करार केला होता. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ’नेबरहूड फर्स्ट’ धोरण आणि व्हिजन सागर अंतर्गत मालदीवशी भारताचे संबंध अधिक वाढवण्यावर भर दिला होता.
 

Related Articles